प्रशासकीय

वादळी वाऱ्याने विद्युत खांब पडल्याने देगलूर शहराचा पाणीपुरवठा खंडित 

खानापूर १३२ केव्ही उपकेंद्राच्या लाईनवरील ६ विद्युत खांब पडले

नांदेड – देगलूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या करडखेड येथील पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने देगलूर शहराचा पाणीपुरवठा शुक्रवारी बंद राहणार आहे. ५ जून रोजी झालेल्या वादळी वारे व पावसामुळे खानापूर १३२ केव्ही उपकेंद्राच्या लाईनवरील ६ विद्युत खांब पडले होते. त्यामुळे करडखेड पंपहाऊसचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे.

हा पुरवठा अद्याप सुरू झाला नाही. महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे देगलूर शहराचा शुक्रवारी होणारा पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन देगलूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!