
नांदेड – लेंडी धरणाच्या बाधित क्षेत्रात पुरामुळे बुडालेल्या गावांमध्ये प्रचंड रोषास बळी पडलेल्या कार्यकारी अभियंता विवेकानंद तिडके यांना अखेर सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने हा निर्णय घेतला असून देगलूरचा हा पदभार आता कार्यकारी अभियंता आशिष चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लेंडी धरण क्षेत्रात अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबतही आता जलसंपदा विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे मुख्य अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांनी स्पष्ट केले.
मुखेड तालुक्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. मुखेडसह लातूर, कर्नाटक राज्यातील बीदर या भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे लेंडी नदीला मोठा पूर आला. लेंडी धरणाच्या झालेल्या घळभरणीमुळे बाधित क्षेत्रातील गावात पाणी शिरले. त्यात भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव यासह इतर काही गावे पाण्याखाली गेली. या पुराचा मोठा फटका प्रामुख्याने हसनाळ आणि रावणगाव या गावांना बसला. हसनाळमध्ये चार महिलांसह एक पुरुष आणि शेकडो जनावरे मृत्युमुखी पडले. रावणगावमध्येही मोठे आर्थिक नुकसान झाले. पुरासंदर्भात यापूर्वी जलसंपदा विभागाने माहिती देताना यंदा धरण फक्त ३० टक्के भरणार असल्याचे बाधित क्षेत्रातील गावकऱ्यांना सांगितले होते. अनेक गावांमध्ये पाणी कुठपर्यंत येईल याची मार्किंगही करण्यात आली होती. त्यामुळे गावकरी निर्धास्त राहिले. रविवारचा काळरात्रीही ते निर्धास्त झोपले होते. मध्यरात्रीनंतर गावात अचानक पाणी शिरल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. गावकरी मिळेल तिथे जीव वाचवण्यासाठी उंच ठिकाणावर धावले. मंदिरात, मस्जिद, उंच ठिकाणावरची वाडे या ठिकाणी थांबून गावकऱ्यांनी जीव वाचवला. ही माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने एसडीआरएफचे पथक तेथे पाठवले. या पथकाकडून तसेच स्थानिक नागरिक, पोलीस दल यांच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू होतेच.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई केली, जाईल असे स्पष्ट केले होते. अखेर जलसंपदा विभागाने या संदर्भातील आदेश काढताना विवेकानंद तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. देगलूरचा पदभार आता चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुखेडमध्ये लेंडी धरण क्षेत्रात अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची चौकशी केली जाणार आहे. अतिवृष्टी या भागात झाली पण त्याचवेळी जलसंपदा विभागाकडून काही चुकीचे निर्णय झाले काय..? याबाबतही आता चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत कोणताही हस्तक्षेप होणार नाही या दृष्टीने तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.
राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीही या सर्व प्रकाराची चौकशी करून कारवाई केली, जाईल असे स्पष्ट केले होते. अखेर जलसंपदा विभागाने या संदर्भातील आदेश काढताना विवेकानंद तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. देगलूरचा पदभार आता चौगुले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मुखेडमध्ये लेंडी धरण क्षेत्रात अचानक निर्माण झालेल्या पूर परिस्थितीची चौकशी केली जाणार आहे. अतिवृष्टी या भागात झाली पण त्याचवेळी जलसंपदा विभागाकडून काही चुकीचे निर्णय झाले काय..? याबाबतही आता चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत कोणताही हस्तक्षेप होणार नाही या दृष्टीने तिडके यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.


