
नांदेड- राज्यातील जि.प. कर्मचा-यांच्या शासनस्तरावरील प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी म.रा. जि.प. कर्मचारी युनियन तर्फे १ ऑगस्ट रोजी काळया फिती लावून आंदोलन करण्यात आले. नांदेड जिल्ह्यातही जिल्हा परिषद मुख्यालय व तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये काळया फिती लावून आंदोलन करण्यात आले. या आंदालनास जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात महिला कर्मचा-यांनी ऊत्स्फुर्त सहभाग घेतला.
जिल्हा परिषद मुख्यालयामध्ये जिल्हा शाखेचे अध्यक्ष धनजंय गुमल्लवार, सचिव राघवेंद्र मदनुरकर, कोषाध्यक्ष सचिन चौदंते, राज्य शाखेचे-पवन तलवारे, संतोष मठपती, सौ. छाया कांबळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये नविन रेडी, सतिश जकाते, जितेंद्र तोटलवार, प्रल्हाद थोरवटे, संजय देशमुख, सिध्दार्थ थोरात, प्रदीप परोडवाड, विक्रम रेणगुंटवार, संतोष राऊत, धुलबा हूरदुके, लक्ष्मीकांत मनियार, प्रमोद गायकवाड, शेख जाफर, अजय सोमठाणकर, गोविंद गज्जेवार, रामदास शेकापुरे, मुक्तेश्वर चिवडे, नारायण डांगे, गजानन आगरमोरे, उमाकांत हाळे, अल्केश शिरशेटवार, सुवर्णकार, मंगेश ढेंबरे, शिवराज कोल्हे, शेख रब्बानी, बालाजी फोले शंकर पापुलवार, ज्ञानेश्वर गिरी, बाबासाहेब राठोड, राजीव केंद्रे, किशोर खिल्लारे, सचिन कारले, हरी वडजे, शेख अजमल, शालीनी शेळके, गंगामुनी आळंदीकर, इंदुमती वाघमारे, बलजीत चव्हाण, एस.एस. शिंपाळे, सुरेकर, नाईकवाडे, अरुणा खिल्लारे, राधाबाई सर्जे, कांचन कुंटे, प्रियंका शिवरात्री, मिनल देशमुख, अवातीरक, बागवाले यांच्यासह शेकडो कर्मचारी महिला व पुरुष सहभागी झाले होते.
तालुका पंचायत समिती स्तरावर सर्व तालुका अध्यक्षांनी व तालुका पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आंदोलन केले व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.