
नांदेड – नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील नेरली या गावामध्ये सार्वजनिक पाण्याच्या टाकीमधून झालेल्या पाणीपुरवठ्याद्वारे विषबाधा झाली. यामध्ये जवळपास ३५० लोकांना ही विषबाधा झाली. या प्रकरणात सर्व महाविकास आघाडीचे व तसेच इतर पक्षातील नेते, प्रशासनातील अधिकारी, जिल्हाधिकारी, सी.ई.ओ या सर्वांनी भेटी दिल्या. घटनेला तीन दिवस झाले आहेत परंतु अद्यापही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नेरलीत जाऊन भेट दिली नाही. पालकमंत्री महाजन यांनी रुग्णांची साधी विचारपूससुद्धा केली नाही. याची खंत व्यक्त करून नांदेड शहर युवक काँग्रेसतर्फे आयटीआय चौकात पालकमंत्री गिरीश महाजन यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंकर बाजीराव शिंदे, गणेश कोकाटे, माणिक देशमुख, हंसराज काटकांबळे, प्रतीक डेमनगुंडे, साजिद खान, प्रसेनजित वाघमारे, अजहर शेख, अक्षय नळगे, सोनू शिंदे, किरण जाधव, माधव कदम, शैलेश पाटील, गजानन जाधव, गोविंद पाटील, बाळू ठाकूर, साहिल शेख, रिजवान पटेल, नईम खान, अब्दुल शेहबाज, शांतनु हाके आदी उपस्थित होते.