प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला मदतीचा हात, जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार 

सप्टेंबरमध्ये २०२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी ८१२ कोटी नुकसान भरपाई मंजूर

नांदेड :- जिल्ह्यात माहे सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे ३३ टक्क्यांहून नुकसान झालेल्या बाधित क्षेत्रासाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
दिनांक ०१.०१.२०२४ च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीसाठी सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी प्राप्त झालेल्या ८१२ कोटी रुपयांमध्ये नांदेड तालुक्यासाठी ३४ हजार ६४१ बाधित शेतकऱ्यांसाठी २९ कोटी ८५ लाख रुपये, अर्धापूर तालुक्यासाठी ३२ हजार ४४८ बाधित शेतकऱ्यांसाठी ३२ कोटी ९७ लाख रुपये, कंधार तालुक्यासाठी ७३ हजार ६५० बाधित शेतकऱ्यांसाठी ७१ कोटी २७ लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी ८० हजार ८४० बाधित शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी ४० लाख रुपये, बिलोली तालुक्यासाठी ३६ हजार ९९ बाधित शेतकऱ्यांसाठी ४६ कोटी ४७ लाख रुपये, नायगाव तालुक्यासाठी ५६ हजार १७२ बाधित शेतकऱ्यांसाठी ५६ कोटी ६४ लाख रुपये, देगलूर तालुक्यासाठी ६१ हजार १२३ बाधित शेतकऱ्यांसाठी ५० कोटी ९५ लाख रुपये, मुखेड तालुक्यासाठी ७९ हजार ६०३ बाधित शेतकऱ्यांसाठी ५५ कोटी ९२ लाख रुपये, धर्माबाद तालुक्यासाठी २८ हजार ७९५ बाधित शेतकऱ्यांसाठी २७ कोटी २६ लाख रुपये, उमरी तालुक्यासाठी ३४ हजार ३८ बाधित शेतकऱ्यांसाठी ३२ कोटी ७० लाख रुपये, भोकर तालुक्यासाठी ४३ हजार ५९ बाधित शेतकऱ्यांसाठी ५२ कोटी १९ लाख रुपये, मुदखेड तालुक्यासाठी ३० हजार ८१२ बाधित शेतकऱ्यांसाठी २९ कोटी ३५ लाख रुपये, हदगाव ७४ हजार २२८ बाधित शेतकऱ्यांसाठी ८२ कोटी २७ लाख रुपये, हिमायतनगर ३४ हजार ५३३ बाधित शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ६१ लाख रुपये,  किनवट तालुक्यासाठी ५७ हजार ७०२ बाधित शेतकऱ्यांसाठी ८० कोटी ४२ लाख रुपये, माहूर तालुक्यासाठी २६ हजार १७२ बाधित शेतकऱ्यांसाठी ३५ कोटी १२ लाख असे एकूण नांदेड जिल्ह्यातील ७ लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांसाठी ८१२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

आ. चिखलीकरांनी केले ई केवायसी करून घेण्याचे आवाहन…सप्टेंबर महिन्यात नांदेड जिल्ह्यासह कंधार आणि लोहा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. खरीप पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकरी हवालदार झाला होता . अशा परिस्थितीत आसमानी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली होती . यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यामुळे या पाठपुराव्याला यश आले आहे. आता कंधार तालुक्यासाठी ७३ हजार ६५० बाधित शेतकऱ्यांसाठी ७१ कोटी २७ लाख रुपये, लोहा तालुक्यासाठी ८० हजार ८४० बाधित शेतकऱ्यांसाठी ८४ कोटी ४० लाख रुपये  रुपये मंजूर झाले आहेत.  त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ई केवायसी करून घ्यावे, असे आवाहन आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!