प्रशासकीय

नांदेडमध्ये पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात ५० उमेदवारांची अंतिम निवड

मेळाव्यात ८ कंपन्यांनी ९३१ रिक्त पदांसाठी नोंदविला सहभाग, रोजगार इच्छूक उमेदवारांचाही चांगला प्रतिसाद

नांदेड : रोजगार इच्छुक युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत बाबानगर नांदेड येथे २१ जानेवारी रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात ८ कंपन्यांनी ९३१ रिक्त पदांसाठी आपला सहभाग नोंदविला होता. यात १५२ उमेदवारांची प्राथमिक तर ५० उमेदवारांची ‍ अंतिम निवड करण्यात आली.

हा मेळावा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त विद्या शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी गणवीर यांची प्रमुख उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यात ८ कंपन्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. शासन आपल्या दारी याप्रमाणे कंपन्या आपल्या दारी असे सूत्र अंगीकारुन जास्तीत जास्त रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार प्राप्त करुन देण्याचे आवाहन उपायुक्त शितोळे यांनी केले.

प्रास्ताविकात कौशल्य विकास विभागाच्या योजनांची तसेच ईस्राईलमध्ये असलेल्या रोजगाराबाबतच्या संधीचा लाभ युवकांनी घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले. मेळाव्याच्या सुरूवातीला दिप प्रज्वलन करून सावित्रीबाई फुले यांच्या ‍प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!