सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मूल्य पुढच्या पिढीत रुजवा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

नांदेड जिल्‍हा परिषदेत विविध उपक्रमांनी भीमजयंती साजरी

नांदेड – भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मूल्य पुढच्या पिढीत रुजवण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करणवाल यांनी केले.

नांदेड जिल्‍हा परिषद अधिकारी-कर्मचारी महात्‍मा ज्‍योतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्‍त जयंती महोत्‍सव समितीच्‍या वतीने रविवारी जिल्‍हा परिषदेत झालेल्‍या भीमजयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात  झालेल्‍या कार्यक्रमात जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम- कदम, अमित राठोड,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवशक्ती पवार, उपशिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, सहाय्यक गट विकास अधिकारी अभय नलावडे, बालाजी नागमवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी करणवाल म्‍हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रकांड पंडित होते. त्यांनी अनेक पुस्तकांचे वाचन करून अनेक पुस्तकांचे लेखन केलेले आहे. त्यांची ही प्रेरणा घेऊन आपणही पुस्तके वाचावीत. तसेच लहान मुलांना आणि युवकांना पुस्तक वाचण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्या म्हणाल्या. कठीण परिस्थितीतही जीवनात कसं उभ राहावं हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते. त्यामुळे जीवनात खचून न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे उभे राहण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन मीनल करणवाल यांनी यावेळी केले.

प्रारंभी उपस्थित मान्‍यवरांच्‍या हस्‍ते भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जयंती मंडळाच्‍या वतीने उपस्थित मान्‍यवरांचा शाल व पुष्‍पहार देवून सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे यांनी केले. याप्रसंगी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार राजेश जोंधळे यांनी मानले.

प्रारंभी जिल्‍हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्‍या उपस्थितीत जिल्‍हा परिषदेतून ढोल ताशांसह मिरवणूक काढून रेल्‍वेस्‍टेशन नजीक विश्‍वरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या पूर्णाकृती पुतळयास भव्‍य पुष्‍पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्‍यानंतर जिल्‍हा परिषदेत अन्‍नदान व थंड पाणी वाटपाचे उद्घाटन करण्‍यात आले. त्‍यानंतर दुपारी जिल्‍हा परिषद परिसरात रुबाब भिमाचा फेम आशिष कांबळे आणि संचाचा भिमगीतांचा प्रबोधनात्‍मक कार्यक्रम घेण्‍यात आला.  एकापेक्षा एक गीतांनी रसिकांची मने जिंकली. यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष पवन तलवारे, सचिव राजेश जोंधळे, कोषाध्यक्ष रणजीत गजभरे, अशोक कासाराळीकर, धनंजय गुमलवार, प्रसिद्धी प्रमुख मिलिंद व्यवहारे, प्रमोद दर्डा, जितेंद्र तोटलवार, व्ही. बी. कांबळे, जीवन कांबळे, धनंजय घुमलवार, धनंजय देशपांडे, शुभम तेलेवार, भास्कर कापसे, विजय वाघमारे, प्रेमाला चौदंते, स्वाती जोंधळे, नंदलाल लोकडे, राजीव वानखेडे, प्रमोद गायकवाड, गणेश आंबेकर, सुरेश सातपुते, ओंकार पांचाळ यांच्यासह जयंती मंडळाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!