हवामान

नांदेडमध्ये विष्णूपुरी प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडले, नावघाट पुलावरून वाहतूक थांबवली 

गोदावरी नदीची पाणीपातळी ३४८ मीटरवर, धोक्याचा इशारा देणारी पातळी ३५१ मीटर..!

नांदेड – जिल्ह्यात व मराठवाड्यातील विविध प्रकल्प क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे विष्णुपुरी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढला आहे. प्रकल्पाचे ११ दरवाजे उघडले आहेत. परभणी जिल्ह्यात दिग्रस बंधाऱ्याचे ४ दारे उघडली आहेत. याशिवाय सिध्देश्वर धरणातूनही मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार नांदेड येथील विष्णुपुरी धरणाचे ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळी ९.३० वाजता प्रकल्पाचा ११ वा दरवाजा उघडण्यात आला. १ लाख ४६ हजार ४४७ क्यूसेस वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी सध्या ३४८ मीटर इतकी आहे. ३५१ मीटर धोक्याची इशारा पातळी आहे. तर ३५४ मीटर ही गोदावरीची धोक्याची पातळी आहे.

विष्णुपुरी प्रकल्पात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह असाच कायम राहिल्यास आणखी काही दरवाजे उघडले जाऊ शकतात. नदीपात्राशेजारी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, पूर परिस्थितीतील आवश्यक काळजी घ्यावी ,असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

नावघाट पुलावरून वाहतूक थांबवली..! विष्णुपुरी प्रकल्पाचे सध्या ११ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे गोदावरी नदी आता धोक्याच्या पातळीकडे जात आहे. सध्या ३४८ मीटरवर गोदावरी नदी वाहत असून धोक्याचा इशारा देणारी पाणी पातळी ही ३५१ मीटर आहे. ३५४ मीटरवर धोकादायक पाणी पातळी आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील नावघाट येथील संत दासगणू पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी जीवरक्षक दलासह पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!